Magha Amavasya 2026 Significance | हिंदू धर्मशास्त्रामध्ये अमावस्येला एक वेगळं आणि तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. दर महिन्याला अमावस्या येते, पण पौष महिन्यातील ही ‘मौनी अमावस्या’ काहीशी खास आणि थोडी सावध करणारी ठरते. असं म्हणतात की, या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते. अनेकदा आपण पाहतो की, घरातली मोठी माणसं या दिवशी बाहेर जाणं किंवा महत्त्वाची कामं करणं टाळायला सांगतात, त्यामागे हेच धार्मिक आणि शास्त्रीय कारण दडलेलं आहे. यंदा १८ जानेवारी, रविवारी ही अमावस्या येत असून ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर काही लोकांसाठी हा दिवस परीक्षेचा ठरू शकतो.Magha Amavasya 2026 Significance
विशेषतः चार अशा राशी आहेत, ज्यांना या काळात नशिबाची साथ मिळण्याऐवजी संघर्षाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तुम्हीही यापैकी एक असाल, तर आजचा दिवस शांत राहून काढलेलाच बरा!
वृषभ राशीच्या लोकांसाठी मालमत्तेचे वाद डोकेदुखी ठरणार
वृषभ राशीच्या जातकांनी या दिवशी थोडं जपून राहावं. खास करून वडिलोपार्जित संपत्ती किंवा जमिनीच्या व्यवहारात आज पडू नका. विनाकारण होणाऱ्या वादांमुळे मानसिक शांतता भंग होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. ऑफिसमध्येही तुमचं काम गुप्त ठेवा; कारण तुमच्याच पाठीमागे तुमचे सहकारी काहीतरी वेगळाच कट रचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सिंह राशीने कागदपत्रांवर विचार करूनच सही करावी
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फसवणुकीचा असू शकतो. घाईघाईत कोणत्याही कागदावर सही करू नका. जर एखादा मोठा व्यवहार करायचा असेल, तर कायदेशीर सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. तुमच्या भविष्यातील योजना कोणालाही सांगू नका, कारण तुमचीच आयडिया चोरून दुसरं कोणीतरी बाजी मारून नेऊ शकतं.
तूळ राशीच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता
तूळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या सन्मानाबाबत आज अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे. कधीकधी आपण चूक केलेली नसते, पण दुसऱ्याच्या चुकीचं खापर आपल्या डोक्यावर फुटतं; असंच काहीसं तुमच्यासोबत घडण्याची चिन्हे आहेत. ऑफिसमध्ये कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. गप्पाटप्पा आणि ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहणं हेच तुमच्या हिताचं ठरेल.
मीन राशीच्या नात्यात येणार दुरावा?
मीन राशीच्या लोकांसाठी ही अमावस्या भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकते. जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. एक छोटासा चुकीचा शब्द तुमच्या नात्यात कायमचा दुरावा निर्माण करू शकतो. नशिबावर अवलंबून न राहता आपल्या कर्मावर लक्ष द्या. जर तुम्हाला एकटं वाटत असेल, तर नकारात्मक विचारांमध्ये वाहून न जाता स्वतःला कोणत्यातरी चांगल्या कामात गुंतवून ठेवा.
एक खास टीप:
अमावस्येचा दिवस हा केवळ सावध राहण्यासाठी नसून तो दानधर्मासाठी सुद्धा खूप मोठा मानला जातो. या दिवशी पवित्र स्नान करून गरिबांना दान दिल्यास अनेक संकटांमधून मार्ग निघतो, असंही शास्त्र सांगतं. त्यामुळे मनातील भीती काढून टाकून देवाची भक्ती करा, येणारा काळ नक्कीच सुखद असेल.
(Disclaimer – ही माहिती पूर्णपणे ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. कोणताही निर्णय घेताना सारासार विचार करावा.)