राज्यात या तारखेला वातावरण बदलणार; हवामान खात्याने वर्तवली मोठी चिंता?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान नेमकं काय करणार, याचा अंदाज लोकांनाही लागत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी अचानक पाऊस, कधी सकाळ-संध्याकाळ थंडी आणि दुपारी जाणवणारा उकाडा, अशा तिहेरी अनुभवातून सध्या महाराष्ट्र जात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला, तर त्यानंतर थंडी हळूहळू कमी होत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामानात थेट बदल होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत आणि 16, 17 व 18 जानेवारी हे तीन दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. Maharashtra Weather Update

गेल्या काही दिवसांत राज्यात सकाळी थंडी, दुपारी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलका पाऊस अशी स्थिती पाहायला मिळाली. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुपारनंतर ढग दाटून येत आहेत. थंडी कमी झाल्यामुळे अनेकांना दिलासा वाटत असतानाच त्याचे आरोग्यावर दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. सर्दी, खोकला, घसा दुखणं यासारख्या तक्रारी वाढल्या असून मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण प्रचंड वाढल्याचं चित्र आहे. इतकी की, श्वास घेणंही धोकादायक ठरत असून अनेक नागरिक मास्क लावूनच घराबाहेर पडताना दिसत आहेत. प्रशासनालाही नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्या लागल्या आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होणार आहेत. डिसेंबर महिन्यात जशी कडाक्याची थंडी होती, तशी ती जानेवारीत दिसत नाही. कारण उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव सध्या तुलनेने कमी आहे. मात्र उत्तर भारतात अजूनही तीव्र थंडी कायम असल्याने त्याचा काही परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः 16 ते 18 जानेवारीदरम्यान पहाटेच्या वेळेत थंडी थोडी वाढू शकते, तर दुपारी काही भागात उकाडा जाणवू शकतो.

राज्यातील तापमानाबाबत बोलायचं झालं, तर निफाडमध्ये सध्या राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून तिथे किमान तापमान 8.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेलं आहे. धुळ्यात 9.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. मात्र उर्वरित अनेक भागांमध्ये थंडीचा जोर ओसरत चालला असून दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. शेतकरी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे बदलते हवामान त्रासदायक ठरत आहे.

हवामान विभागाने उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस थंडीची लाट ते तीव्र थंडीची लाट राहण्याचा इशारा दिला आहे. जर उत्तरेकडील ही थंडी आणखी तीव्र झाली, तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो आणि राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

एकंदरीत पाहता 16, 17 आणि 18 जानेवारीदरम्यान राज्यात हवामान स्थिर न राहता बदलत राहील. सकाळ-संध्याकाळ थंडी, दुपारी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं तापमानातील बदल लक्षात घेऊन कपड्यांची योग्य निवड करणं आणि विशेषतः प्रदूषित शहरांमध्ये बाहेर पडताना खबरदारी घेणं गरजेचं ठरणार आहे. येत्या काही दिवसांत राज्याचं हवामान नेमकं कुठं स्थिरावतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे पण वाचा : पुढील 24 तास धोक्याचे! ‘या’ 4 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा..

Leave a Comment

error: Content is protected !!